डोंबिवली : डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना अकरा टक्के वेतनवाढ देण्याचा करार ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघ आणि डोंबिवली नागरी सहकारी बँक व्यवस्थापनात झाला. एप्रिल २०२१ ते मार्च २०२४ साठी हा वेतन करार असेल.

करोना महासाथीच्या दीड वर्षांत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने ग्राहक सेवा दिली; करोनायोद्धे म्हणून त्यांच्या सेवेचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे यांनी दिली. या कराराप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतनवाढीबरोबर गृह कर्ज, वाहन, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज उपलब्ध होणार आहे.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

ठाणे जिल्हा कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या करारासंबंधात दाखवलेली प्रगल्भता कौतुकास पात्र असून उद्योग विश्वात व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांनी लढण्याची मन:स्थिती सोडून यापुढे दोघांनी एकत्र मिळून आव्हानात्मक परिस्थितीला एकदिलाने सामोरे जाणे आवश्यक आहे. ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संदर्भात प्रत्यक्ष घडत आहे. करोना महासाथीच्या काळात उभयपक्षी सकारात्मक, सामंजस्याने भूमिका घेत अत्यंत कमी कालावधीत व सौहार्दपूर्ण चर्चेने हा वेतन करार झाला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सनदी लेखापाल उदय कर्वे यांनी दिली.

गेल्या दीड वर्षांत करोना विषाणू साथीने महाभयावह परिस्थिती निर्माण केली आहे. नोकरी, रोजगार क्षेत्रात बाहेर बिकट परिस्थिती असताना डोंबिवली नागरी बँकेने तत्परतेने कर्मचारी वेतनवाढीचा करार अल्प कालावधीत एकाच बैठकीत केला हे कौतुकास्पद आहे; कर्मचारी संघटनेसाठीही ही महत्त्वपूर्ण घटना आहे, असे ठाणे जिल्हा बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल ढुमणे यांनी सांगितले. कराराप्रसंगी बँकेचे संचालक, महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेतन करारामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.