मुंबई : चौथी औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी जागतिक स्तरावरील बदलानुसार महाराष्ट्र शासन नवे औद्योगिक धोरण ठरवत असून त्यासाठी उद्योजक, औद्योगिक संघटनांच्या सूचनांचा साकल्याने विचार केला जाईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाचे नवीन औद्योगिक धोरण ठरवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी देसाई यांनी नवीन औद्योगिक धोरण ठरवण्यामागची भूमिका विषद केली. राज्य शासनाच्या उद्योग विभागाने नवीन औद्योगिक धोरण ठरवण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी उद्योजकांसोबत चर्चा करून सूचना मागविल्या होत्या. त्याच अनुषंगाने सोमवारी मुंबई येथे पुन्हा राज्यभरातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच उद्योजकांची कार्यशाळा घेण्यात आली. जागतिक स्तरावरील बदलानुसार चौथी औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी नवे औद्योगिक धोरण ठरवण्यात येत असल्याचा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. नव्या धोरणात विजेवर चालणाऱ्या वाहनांबाबतचे धोरण, नॅनो टेक्नॉलॉजी, विकास व संशोधन, महिला उद्योजक धोरण, अन्न प्रक्रिया उद्योग, औषधनिर्मिती या क्षेत्रावर अधिक भर दिला जाणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra new industrial policy as per global change
First published on: 11-09-2018 at 01:49 IST