मूळच्या ब्रिटनमधील मार्क्‍स अ‍ॅण्ड स्पेन्सरचे भारतातील सर्वात मोठे दालन सोमवारी मुंबईत सुरू करण्यात आले. वांद्रे येथे ३५,००० चौरस फूटवरील या दालनात विविध ३०० हून अधिक उत्पादने आहेत. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी मार्क बोलॅण्ड व रिलायन्सच्या नीता अंबानी याही उपस्थित होत्या. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व बिपाशा बासू यांनीदेखील यावेळी हजेरी दाखविली. उभय कंपन्यांमार्फत देशात किरकोळ साखळी व्यवसाय भागीदारीत केला जात आहे. त्यांची तूर्त ३६ दालने देशभरात आहेत. चालू आर्थिक वर्षअखेर आणखी आठ दालने सुरू करण्यात येतील तर २०१६ पर्यंत त्यांची एकूण संख्या ८० हून अधिक होईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.