चीनच्या अर्थविकासाबाबत साशंकता निर्माण करतानाच ‘ओईसीडी’ या पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या आर्थिक विकासाबाबत आशावाद व्यक्त केला आहे. ‘ओईसीडी’ (ऑर्गनायजेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट) ही आर्थिक सहकार्य आणि विकास क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संघटना आहे. २०१४-१५ मध्ये भारताचा विकास दर ७.४ टक्के प्रवास करण्याची शक्यता वर्तवितानाच संस्थेने तुलनेत चीनचा चालू आर्थिक वर्षांतील प्रवासही कमी होण्याची शंका उपस्थित केली आहे.
मूडीच्या पतमानांकन उंचावण्याच्या तयारीमुळे निश्चितच आनंद झाला आहे. मात्र सरकारसाठी करण्यासारखे आणखी बरेच काही आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेचे पतमानांकन स्थिरतेकडून सकारात्मक दिशेने नेण्याचे संकेत दिले आहेत. आर्थिक स्थिती सुधाराचे हे लक्षणच आहे, असे म्हणायला हरकत नाही.
*अरुण जेटली, अर्थमंत्री

पतमानांकन उंचावण्याच्या मूडीच्या भूमिकेने भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल आशावाद व्यक्त झाला आहे. त्याचबरोबर या माध्यमातून आमचे सरकारही गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारद्वारे घेतल्या गेलेल्या निर्णयांचे प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेवर परिणामही दिसू लागतील.
*जयंत सिन्हा, अर्थ राज्यमंत्री