LIC Pension : भारतीय आयुर्विमा महामंडळ देशाची सर्वात विश्वसनीय आणि मोठी विमा कंपनी आहे. अनेकदा लोकांच्या गरजांनुसार हे विमा पॉलिसी सादर करतात. एलआयसीची अशीच एक पॉलिसी आहे जिचं नाव आहे ‘सरल पेन्शन स्कीम’. यामध्ये एकदाच प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळू शकते. तुम्हालाही वयाच्या ६० वर्षांनंतर सुरक्षित भविष्य हवे असेल आणि दैनंदिन खर्चासाठी गुंतवणूक करायची असेल, तर एलआयसीची सरल पेन्शन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

काय आहे ही स्कीम?

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सरल पेन्शन स्कीममध्ये तुम्हाला केवळ एकदाच प्रीमियम भरावे लागेल. यानंतर तुम्हाला वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा १२ हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते. जाणून घेऊया या योजनेची तपशील माहिती.

Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

सरल पेन्शन स्कीममध्ये मिळणार दोन फायदे

या योजनेत ‘लाईफ ऍन्युटी विथ 100% रिटर्न ऑफ पर्चेस प्राईज’ अंतर्गत पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत त्याला दरमहा १२ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. यादरम्यान जर त्यांचा मृत्यू झाला तर प्रीमियम नॉमिनीला परत केला जातो. परंतु, केवळ पेन्शनधारक व्यक्तीच या योजनेतून मिळणाऱ्या फायद्याचा लाभ घेऊ शकते.

जॉईंट लाईफ पेन्शन योजना

यामध्ये पतिपत्नी दोघेही सहभागी होऊ शकतात. दोघांपैकी जे कोणी दीर्घकाळ जिवंत राहतील त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहील. दोघांच्या मृत्यूनंतर नॉमिनीला प्रीमियमची रक्कम मिळेल.

सरळ पेन्शन योजनेशी निगडित महत्त्वाच्या बाबी

>> एलआयसीच्या या योजनेत ऑनलाइन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करता येऊ शकते.

>> पॉलिसी घेताच पेन्शनधारकांना पेन्शन सुरु होते.

>> यात मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शनची निवड करता येईल.

>> या योजनेत किमान १२ हजार रुपयांची वार्षिक गुंतवणूक आणि कमाल गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही.

>> ४० ते ६० वर्षे वय असणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

>> पॉलिसी सुरू झाल्यापासून ६ महिन्यांनंतर कर्जाची सुविधा मिळते.