जागतिक अर्थमंदी आणि नैसर्गिक संकटे या दोन्हीच्या कचाट्यात भारतीय अर्थव्यवस्था सापडली असल्याचा उल्लेख करून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विविध योजना आणि तरतुदींच्या आधारे शेतकरी, उद्योजक, नोकरदार यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण खरेखुरे ‘अच्छे दिन’ येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. अर्थसंकल्पाचा हा विश्लेषणात्मक लेखाजोखा…