वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे स्वच्छ हवा मिळणे दुरापास्त होत चालले आहे. प्रदूषणामुळे विविध आजारांदेखील बळावत चालले आहेत. दिल्ली, मुंबई सारख्या शहरांमध्ये तर, स्वच्छ हवा हा एक गंभीर विषय आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने स्वच्छ हवेच्या मुद्दांकडे विशेष लक्ष दिले आहे. मोठया शहरांमध्ये स्वच्छ हवेसाठी नागरीक आग्रही असतात. स्वच्छ हवेचे प्रमाण कमी होणे हा अनेक जागरुक नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे.

आणखी वाचा – Budget 2020: “एप्रिलपासून जीएसटी भरण्याची प्रक्रिया होणार अधिक सोपी”

हीच बाब लक्षात घेऊन सरकारने स्वच्छ हवेसाठी ४,४०० कोटींची तरतूद केली आहे. स्वच्छ हवा नागरिकांना मिळाली पाहिजे. त्यासाठी राज्यांनी त्यांच्या पातळीवर अंमलबजावणी करावी, यासाठी केंद्र सरकारने ४,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.