मुंबई : गेल्या आठवडय़ाभरात झालेल्या भांडवली बाजारातील घसरणीमुळे भांडवली बाजारातील नव्याने पदार्पण केलेल्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित क्षेत्रातील ‘पेटीएम’, नायका, पॉलिसीबझार, कारट्रेड टेक यांसारख्या नवउद्यमी कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांच्या दोन लाख कोटी रुपयांचे मूल्य ऱ्हास सोसावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरलेल्या वर्षांत तेजीवर स्वार झालेल्या भांडवली बाजारातील पोषक वातावरणाचा फायदा घेत, जानेवारी २०२१ पासून ६३ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून १,१८,७०४ कोटींचा विक्रमी निधी उभारला आहे. त्यातही नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांचे ‘आयपीओ’ गुंतवणूकदारांचा उमदा प्रतिसाद मिळवीत यशस्वी ठरले. तोटय़ात असूनदेखील या कंपन्या मोठा निधी उभारण्यास यशस्वी ठरल्याच, शिवाय काही अपवाद केल्यास त्यांच्या समभागांनी सूचिबद्धतेला मोठे अधिमूल्यही मिळविले होते. मात्र सूचिबद्धतेनंतर साधारण गेल्या महिन्यापासून या समभागात तीव्र स्वरूपाची घसरण सुरू आहे. 

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investors lost over two lakh crore for investing in newly listed companies zws
First published on: 26-01-2022 at 03:32 IST