अनुराधा सहस्रबुद्धे

आयुष्य ही अतिशय अनमोल गोष्ट आहे. परंतु आयुष्य हे अशाश्वत  देखील आहे.  भविष्यात काय घडते हे कोणीही सांगू शकत नाही. दुर्दैवाने घरातील कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास, कुटुंबाला आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित करण्याचा विमा हा एक सर्वमान्य मार्ग आहे. शुद्ध विमा किंवा मुदत विमा अशा अनिश्चिततेसाठी तयार करण्यात मदत करते.

जोखीम कमी करण्यासाठी सर्वात स्वस्त पद्धतींपैकी एक म्हणजे मुदतीचा विमा ही गोष्ट असल्याने त्याला विमा इच्छुकांची पसंती लाभत आहे. विमा इच्छुकांची ही गरज पूर्ण करण्यासाठी देशातील सर्वात मोठय़ा आणि सर्वात विश्वासप्राप्त विमा कंपनी असलेल्या एलआयसीने जीवन अमर योजना विमा खरेदी इच्छुकांना उपलब्ध करून दिली आहे.

मुदत विमा खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. असे काही मूलभूत मुद्दे पुढीलप्रमाणे –

*  सर्वात कमी विमा हप्ता: विम्याच्या रकमेमध्ये गुंतवणुकीचे घटक नसल्यामुळे, सर्व मुदतीच्या विम्याचा हप्ता इतर कोणत्याही विमा योजनांच्या तुलनेत कमी असतो.

*  अत्याधिक लवचीकता : विमा हप्ता एकरकमी किंवा नियमित भरण्याचा पर्याय या प्लानमध्ये उपलब्ध आहे. विमा छत्र स्थिर किंवा वर्धिष्णू प्रकारात उपलब्ध आहे. जीवन अमरचा हा एक मुख्य फायदा आहे. स्थिर प्रकारात विमा योजनेच्या मुदतीत निश्चित विमा छत्राइतके संरक्षण विमाधारकास ही योजना प्रदान करते. वर्धिष्णू प्रकारात पहिले पाच वर्षे विमा छत्रात बदल होत नाही. तर पाच वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने विमा छत्रात वाढ होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आज विमा खरेदी इच्छुक ३५ वर्षांचा आहे, आणखी दहा वर्षांनी तो अतिरिक्त विमा पॉलिसी खरेदी करू इच्छित असेल तर त्या वेळी कदाचित आरोग्याच्या तक्रारीमुळे नवीन पॉलिसी खरेदी करणे शक्य होईलच याची खात्री देता येत नसल्याने वर्धिष्णू पर्याय निवडल्यास ठरावीक कालावधीनंतर विमा छत्रात वाढ होत जाईल. अपघाती मृत्यू झाल्यास वाढीव अतिरिक्त विमा संरक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

* आर्थिक सुरक्षा : अकाली मृत्यू ओढवल्यास विमा लाभ एकरकमी निश्चित कालावधीत किंवा नियमित उत्पन्नाच्या रूपात मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही कोणतीही मुदत योजना खरेदी करता तेव्हा तुमच्या आरोग्याची स्थिती, वित्त व सवयी आदींबाबत तुम्ही अचूक सत्य सांगितलेले असल्याची खात्री केल्यानंतर विमा कंपनी तुमची जोखीम स्वीकारत असते. नुकत्याच झालेल्या विमा नियामक व विकास प्राधिकरण (आयआरडीए)च्या आदेशानुसार कोणतीही विमा कंपनी दोन वर्षांनी असा दावा करू शकत नाही की, पॉलिसी प्रभावी झाल्यानंतर तुमच्या आरोग्याची स्थिती, वित्त, व सवयी या बाबत माहिती विमाधारकाने दडवली आहे. एलआयसीचे विमा दावे स्वीकारण्याचा दर सर्वाधिक असून या निकषावर जीवनअमर हा प्लान सर्वात विश्वासपात्र आहे.

मुदत विमा योजनेमध्ये पुढील कारणांनी मृत्यू झाल्यास दावा स्वीकारला जात नाही.

* दारूच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यामुळे मृत्यू

* विशिष्ट औषधांच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यामुळे अपघाती मृत्यू

*  रेसिंग इव्हेंटमध्ये भाग घेतल्यामुळे मृत्यू (कार रेसिंग आणि बाईक रेसिंग)

*  साहसी कार्यात भाग घेतल्यामुळे मृत्यू (हायकिंग, वॉटर स्पोर्ट्स, ट्रेकिंग इ.)

*  गर्भधारणा आणि बाळंतपणामुळे मृत्यू

*  गुन्हेगारी कार्यात सहभागी झाल्यामुळे होणारा मृत्यू

*  पूर्वीच्या आरोग्याच्या स्थितीमुळे मृत्यू

*  बेकायदेशीर कार्यात भाग घेतल्यामुळे मृत्यू (जमीन कायद्यानुसार)

* जीवन विमा योजनेच्या अटींनुसार अपवाद

पॉलिसी प्रभावी झाल्यानंतर वर्षभरात आत्महत्या केल्यास दावा स्वीकारला जात नाही. कोणतीही मुदत विमा योजना आत्महत्येमुळे दावा स्वीकारणार नाही. हे गट विमा योजनेअंतर्गत वगळण्याच्या यादीमध्येदेखील ठेवले आहे. काही प्रकरणांमध्ये, विमा कंपनी पॉलिसीधारकांनी पॉलिसीशी संबंधित खर्चाची वजावट केल्यानंतर मृत्यूपर्यंत तारखेपर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या ९० टक्के रक्कम परत करेल.

*  जीवनशैलीत बदल :

जीवन विमा पॉलिसी घेतल्यानंतर जीवनशैलीत बदल झाल्यास, पॉलिसीधारकावर ही माहिती सामायिक करण्याचे बंधन नाही. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला धूम्रपान करण्याचे व्यसन असल्यास, विमा संरक्षण लागू होते आणि विमा कंपनीने कोणत्याही समस्येशिवाय दाव्यावर प्रक्रिया केली पाहिजे. पॉलिसीवर दावा करण्यात काही अडचण असल्यास आपण थेट विमा कंपनी किंवा आयआरडीएआयच्या तक्रार सेलकडे संपर्क साधू शकता.

जर आपण दोनपेक्षा जास्त जीवन विमा पॉलिसी घेत असाल तर नवीन पॉलिसी घेताना आधीच्या पॉलिसीमुळे मिळणारा विमा लाभ जाहीर करणे बंधनकारक आहे. दोन्हींचा दावा करीत असाल तर आपण आयआरडीएआयच्या नियमांनुसार चरणांचे अनुसरण केले पाहिजे. खरे तर, नवीन जीवन विमा उत्पादनाची सदस्यता घेताना आपण दुसऱ्या जीवन विमा योजनेचे अस्तित्व सादर केले पाहिजे. प्रस्ताव फॉर्ममध्ये ही माहिती सामायिक करावी. ‘मृत्यू प्रमाणपत्र’ त्याच विमा कंपनीकडे सादर केले जाईल ज्या विमा कंपनीशी दीर्घकाळ संबंध आहे. जीवन विमा योजना खरेदी करण्यापूर्वी, आपण दस्तऐवजीकरण केले पाहिजे. आपल्याला वैशिष्टय़े आणि फायद्यांबद्दल माहिती असल्यास आपण विमा प्रदात्यासह करारावर स्वाक्षरी करू शकता जेणेकरून विमा पॉलिसीचा दावा करण्यात कोणतीही अडचण संभवणार नाही. मुदत विमा योजनेत ठरावीक कारणांनी मृत्यू आल्यास दावा स्वीकारला जात नाहीत. म्हणूनच, आपण हा अपवाद समजला पाहिजे आणि आपल्या गरजेनुसार सर्वात योग्य योजनेची निवड करायला हवी. या सर्व गोष्टींची पूर्तता जीवन अमर करीत असल्याने ही विमा योजना एक परिपूर्ण विमा संरक्षण प्रदान करते. म्हणूनच दसऱ्याला जीवन अमर खरेदी करून सीमोल्लंघन करावे.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)