हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अनेक ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याद्वारे जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांवर मात करता येते. हल्ली प्रत्येकाला आपल्या आयुष्यात येणारे संकट टाळायचे असते आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी सर्व प्रयत्नही करतात. अनेक वेळा जीवनातील संकटांमुळे अनेकजण स्वतःला दोष देऊ लागतात आणि आपल्या नशीबाबद्दल निराश होते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला काही ज्योतिषीय उपाय आणि युक्त्या सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता.

अशी अनेक घरे आहेत जिथे आशीर्वाद नाही, भरपूर पैसा मिळवूनही घरात पैसा राहत नाही. त्यामुळे शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारी काळी हळद, नागकेशर आणि सिंदूर मिसळलेली चांदीची पेटी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी. असे मानले जाते की ही हळद पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवल्याने तिजोरी कधीही रिकामी होत नाही.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

याशिवाय, जर तुम्हाला तुमचे नशीब कमी वेळात उजळवायचं असेल, तर दररोज मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ घाला. असे केल्याने तुमच्या पापकर्मांचा नाश होऊन पुण्य उत्पन्न होईल. हे पुण्य कर्म तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरतील. घरामध्ये स्थापित देवतांना दररोज फुलांनी सजवावे.

आणखी वाचा : Chanakya Niti: असे पालक आपल्याच मुलांचे शत्रू बनतात

तुमचे नशीब साथ देत नसेल तर रोज सकाळी पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करा. यामुळे विष्णुजी आणि बृहस्पतीदेव यांचा आशीर्वाद राहतो, त्यामुळे तुमचे भाग्य वाढते. जर तुम्ही संध्याकाळी अंघोळ करत असाल तर पाण्यात चिमूटभर मीठ टाका. यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते.