Akhand Samrajya Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी उदय आणि अस्त होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-जगावर होताना दिसतो. यासोबतच उगवत्या ग्रहांमुळे अनेक शुभ योगही बनतात. शनिदेव ९ मार्चला उदय होत अखंड साम्राज्य राजयोग तयार करणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना यावेळी धनलाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मकर राशी

अखंड साम्राज्य योगाची निर्मित मकर राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धनाच्या घरात उदय होणार आहेत. ज्याला पैसा आणि वाणीचा अर्थ समजला जातो. त्यामुळे यावेळी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. त्याच वेळी, तुमच्या बोलण्याचा प्रभाव दिसून येईल. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल आणि तुमची प्रशासकीय क्षमता वाढेल. तसेच, जे मीडिया, फिल्म लाइन आणि मार्केटिंग कामगार आहेत त्यांच्यासाठी ही वेळ चांगली सिद्ध होईल.

Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
citizenship question in the constituent assembly constituent assembly debate on
चतु:सूत्र : नागरिकतेचा पैस

धनु राशी

अखंड साम्राज्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनि ग्रह तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात येईल. यावेळी शनिदेव बलवान असतात. त्यामुळे यावेळी तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होईल. तसेच, या संक्रमणादरम्यान तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. या काळात तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. यासोबतच तुम्हाला भाऊ-बहिणीची साथ मिळेल. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर १७ जानेवारीपासून तुम्हाला साडेसतीपासून मुक्तीही मिळाली आहे.

( हे ही वाचा: १५ मार्चपासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? सुर्यदेवाचा प्रवेश मिळवून देणार बक्कळ धनलाभाची संधी)

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी अखंड साम्राज्य राजयोग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून नवव्या घरात शनिदेवाचा उदय होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे भाग्य चमकेल. यासोबत आधीपासून अडकलेले काम यावेळी पूर्ण होईल. दुसरीकडे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता असते. तसेच, तुम्ही या काळात नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)