Chanakya Niti for Successful Life: आचार्य चाणक्य यांची गणना भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. ते एक कुशल राजकारणी, मुत्सद्दी आणि रणनीतिकार असण्यासोबतच अर्थशास्त्राचे तज्ज्ञ देखील होते. समस्या टाळण्यासाठी, लोक अनेकदा चाणक्य नीतीचा अवलंब करतात. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये व्यावहारिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना आजही महत्त्व आहे. या गोष्टींचा अवलंब केल्यास अनेक समस्या आणि संकटे टळू शकतात. आचार्य चाणक्यांच्या धोरणांनुसार, जीवनात काही लोक असे असतात जे तुमच्या समस्या दूर करण्याऐवजी त्या वाढवण्याचे काम करतात. चाणक्य या लोकांपासून अंतर ठेवण्याचा सल्ला देतात. आज आपण चाणक्य नीतीमध्ये उल्लेख केलेल्या अशा लोकांबद्दल जाणून घेत आहोत, ज्यांच्यापासून दूर राहणेच आपल्यासाठी चांगले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, या लोकांसोबत कधीही राहू नका कारण ते तुम्हाला कधीही फसवू शकतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुम्हाला आनंदी-यशस्वी जीवन जगायचे असेल आणि स्वतःला संकटांपासून वाचवायचे असेल तर काही लोकांपासून दूर राहणे चांगले आहे. चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात वाईट लोकांच्या काही सवयी सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या आयुष्याला हानी पोहोचवू शकतात. अशा लोकांशी संबंध ठेवणे धोकादायक ठरू शकते, चला जाणून घेऊया चाणक्य नितीमध्ये कोणत्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्यांनी दिला आहे.
‘अशा’ लोकांपासून नेहमी दूरच रहा
१. जास्त गोड बोलणारे लोक
असे लोक जे नेहमी जास्त गोड बोलतात, विनाकारण तुमची स्तुती करतात, अशा लोकांपासून सावध रहा. असे लोक आपला हेतु साधण्यासाठी तुमच्याशी चांगले बोलून कधीही फसवू शकतात. जराही विचार न करता ही लोक कधीही विश्वासघात करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर रहा.
२. आपल्या बोलण्यावर ठाम नसलेली लोक
जे लोक नेहमी मोठी आश्वासने देतात परंतु कोणतीही आश्वासने पूर्ण करत नाहीत त्यांच्यापासून दूर रहा. अशी माणसे तुमच्या कधीच उपयोगात येणार नाहीत, उलट संकटाच्या वेळी तुमची साथ सोडतील.
३. विश्वासघातकी लोक
हे लोक ओळखणे थोडे कठीण आहे कारण ते तुमच्या समोर तुमच्या शुभचिंतकासारखे वागतात पण तुमचे नुकसान करण्यात, तुमच्या मागे तुमची प्रतिमा खराब करण्यात व्यस्त असतात. अशा लोकांना ओळखा आणि लगेच त्यांच्यापासून दूर राहा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)