आचार्य चाणक्य अर्थात कौटिल्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात राहणीमान, वेशभूषा, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, वर्तन आणि देशाप्रती असलेली ओढ याविषयी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. जर एखाद्या माणसाने या सर्व गोष्टी आत्मसात केल्या तर तो जगातील अद्भुत मानवांपैकी एक होईल. आचार्य चाणक्य यांनी देखील मानवी जीवनातील आरोग्य, नातेसंबंध आणि संपत्तीचे स्पष्टीकरण दिले आहे. सामान्य माणसाच्या जीवनात त्याचे महत्त्व काय आहे हे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचार्य चाणक्य यांचे मानवी आरोग्याबद्दलचे विचार
चाणक्यांनी लिहिले की, आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. अशा परिस्थितीत माणूस निरोगी शरीर, निरोगी मन, निरोगी विचारांचा मालक असेल, तर तो मोठ्या समस्यांनाही सहज सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे हा मानवाचा पहिला विचार असायला हवा. चाणक्य यांच्या नीतिनुसार स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी जेवताना थोडेसे पाणी घ्यावे, जेवल्यानंतर लगेच पाणी घेऊ नये. कारण ते विषासारखे असते. जेवल्यानंतर फक्त एक तासाने पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti according to chanakya health wealth and relationships should be like this prp
First published on: 01-10-2022 at 10:55 IST