scorecardresearch

Premium

Chanakya Niti: ‘या’ लोकांपासून नेहमी दूर राहा; ते कधीही करू शकतात तुमचा विश्वासघात!

Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये जीवनातील संकटांपासून दूर राहण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. यासोबतच काही बाबतीत खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, आयुष्यात काही लोकांपासून दूर राहणे केव्हाही चांगले असते.

chanakya niti for enemy
फोटो( संग्रहित फोटो)

Chanakya Niti for Successful Life: आचार्य चाणक्य हे जगातील महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये व्यावहारिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना आजही महत्त्व आहे. या गोष्टींचा अवलंब केल्यास अनेक समस्या आणि संकटे टळू शकतात. आज आपण चाणक्य नीतीमध्ये उल्लेख केलेल्या अशा लोकांबद्दल जाणून घेत आहोत, ज्यांच्यापासून दूर राहणेच आपल्यासाठी चांगले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की या लोकांसोबत कधीही राहू नका कारण ते तुम्हाला कधीही फसवू शकतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला आनंदी-यशस्वी जीवन जगायचे असेल आणि स्वतःला संकटांपासून वाचवायचे असेल तर काही लोकांपासून दूर राहणे चांगले आहे. चला जाणून घेऊया चाणक्य नितीमध्ये कोणत्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

जास्त गोड बोलणारे लोक

असे लोक जे नेहमी जास्त गोड बोलतात, विनाकारण तुमची स्तुती करतात, अशा लोकांपासून सावध रहा. असे लोक आपला हेतु साधण्यासाठी तुमच्याशी चांगले बोलून कधीही फसवू शकतात. जराही विचार न करता ही लोक कधीही विश्वासघात करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर रहा.

( हे ही वाचा: शनिदेवाने मकर राशीत गोचर करत बनवला केंद्र त्रिकोण राजयोग! ‘या’३ राशींना प्रगतीसोबत होईल प्रचंड धनलाभ)

आपल्या बोलण्यावर ठाम नसलेली लोक

जे लोक नेहमी मोठी आश्वासने देतात परंतु कोणतीही आश्वासने पूर्ण करत नाहीत त्यांच्यापासून दूर रहा. अशी माणसे तुमचा कधीच उपयोगात येणार नाहीत, उलट संकटाच्या वेळी तुमची साथ सोडतील.

विश्वासघातकी लोक

हे लोक ओळखणे थोडे कठीण आहे कारण ते तुमच्या समोर तुमच्या शुभचिंतकासारखे वागतात पण तुमचे नुकसान करण्यात, तुमच्या मागे तुमची प्रतिमा खराब करण्यात व्यस्त असतात. अशा लोकांना ओळखा आणि लगेच त्यांच्यापासून दूर राहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-08-2022 at 10:50 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×