महान मुत्सद्दी आचार्य चाणक्य यांच्या धोरणांमुळेच नंद वंशाचा नाश झाला आणि चंद्रगुप्त मौर्याला सम्राटाचा मुकुट मिळाला. आचार्य चाणक्यांची नीति माणसाला केवळ यश मिळवून देत नाही तर अनेक संकटांपासून वाचवते. या धोरणांमध्ये व्यक्तीने आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे हे सांगितलंय. नाहीतर आयुष्यात वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. या वेळेत आपलेही साथ सोडून जातातचाणक्य नीति म्हणते की पैसा जरी सर्व सुख विकत घेऊ शकत नसला तरी जीवनासाठी ते खूप महत्वाचे आहे. माणसाकडे पैसा नसतानाही त्याचेच लोक त्याला सोडून जातात. मग ते त्याचे भाऊ-बहीण असोत, पत्नी असोत वा मित्र असोत, नोकर-चाकर असोत. जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत होते, तेव्हा सर्व लोक त्याच्याशी संबंध ठेवण्यास उत्सुक असतात. म्हणूनच पैसा असणं खूप महत्वाचे आहे. आणखी वाचा : Dussehra 2022 : यावर्षी दसरा ४ की ५ ऑक्टोबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व …पण पैसे कमवताना ही चूक करू नकाआचार्य चाणक्य यांनी पैशाचे महत्त्व तसंच ते मिळवण्याचे मार्ग सांगितले आहेत. चाणक्य नीति म्हणते की, चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशापेक्षा कमी पैशात जगणे चांगले आहे. कारण अनैतिक काम करून मिळवलेला पैसा जास्तीत जास्त १० वर्षे व्यक्तीकडे राहतो. असा पैसा कधी ना कधी निघून जातो. तसेच चुकीची कामे करून कमावलेला पैसाही अनेक संकटे घेऊन येतो. त्यामुळे व्यक्तीची प्रतिमाही खराब होते. (टीप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)