आचार्य चाणक्य हे महान विद्वानांपैकी एक आहे. त्यांची चाणक्य नीती जगप्रसिद्ध आहे. वैवाहिक आयुष्य असो की समाज, राजकारण, व्यवसाय, पैसा किंवा आरोग्य यावर चाणक्य नीतीमध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहे. त्यांची नीती आजही अनेक जण फॉलो करतात.
आज आपण चाणक्य नीतीनुसार महिलांच्या त्या तीन सवयींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे महिला अडचणीत येतात, असे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. आजारपण लपवू नये…

अनेक महिलांना आजारपण लपवण्याची सवय असते. त्या कोणत्याही आजाराकडे गांभीर्याने पाहत नाहीत, मात्र त्यानंतर आजारपण वाढल्यास त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे चाणक्य नीती सांगते की महिलांनी आपला आजार कधीही लपवू नये.

हेही वाचा: Horoscope : राशीभविष्य, शनिवार २७ मे २०२३

२. प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणे..

अनेकदा महिला नवऱ्याने किंवा कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार करतात. अनेकदा इच्छा नसतानाही त्या अनेक गोष्टी स्वीकारतात; कारण त्यांना घरात क्लेष नको असतो. त्यानंतर त्यांना पश्चात्तापही होतो. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की महिलांनी आपापली मते मांडायला पाहिजेत. आपला आत्मसन्मान जपला पाहिजे.

३. खोटे बोलू नये…

असं म्हणतात वाद टाळण्यासाठी अनेकदा महिला खोटे बोलून वेळ मारून नेण्याचा विचार करतात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चाणक्य यांच्या मते महिलांचे खोटे बोलणे अनेकदा त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे महिलांनी चुकूनही खोटे बोलू नये आणि नेहमी सत्याचा सामना करावा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti these three bad habits of women falls them in problems or trouble read about acharya chanakya ndj
First published on: 28-05-2023 at 10:52 IST