चाणक्य हे भारतातील एक असे नाव आहे, ज्याचे आजही लाखो लोक आदराने स्मरण करतात. समाजाच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि अनेक सिद्धांत रचले. त्यांची तत्त्वे केवळ राजकारणातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहेत. चाणक्य यांनी अशा महिलांचा उल्लेख केला आहे, ज्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनसाथी बनल्या, तर त्याचे आयुष्य बदलण्यास वेळ लागत नाही.

चाणक्य नीतिनुसार शांत स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याच वेळी, नेहमी रागात राहणाऱ्या स्त्रीला चांडालिनीचे रूप म्हटले जाते, जिच्यापासून प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा बचाव करायचा असतो. अशा परिस्थितीत शांत मनाची स्त्री पुरुषाच्या आयुष्यात पत्नी म्हणून आली तर ती घराची शोभा तर वाढवतेच शिवाय कुटुंबात एकता आणि सुख-शांती टिकवून ठेवते. त्यामुळे त्या कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

‘या’ दिशेला तोंड करून जेवल्याने कुबेर देवाची राहणार विशेष कृपा; घरात येईल अमाप धन-संपत्ती

आचार्य चाणक्य म्हणतात की, जर एखादी शिक्षित, सद्गुणी आणि सुसंस्कृत स्त्री पत्नीच्या रूपात आयुष्यात आली तर ती कुटुंबाला प्रत्येक परिस्थितीत मदत करण्यासाठी तत्पर असते. अशा महिला केवळ आत्मविश्वासाने भरलेल्या नसून मोठे निर्णय घेण्यातही निर्भय असतात. अशा महिला केवळ त्यांच्या पतींसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणा बनतात.

काही महिला आपल्या गोड वाणीने प्रत्येकाचे मन मोहून टाकतात. गोड बोलणाऱ्या स्त्रिया, मग ते नातेवाईक असोत वा शेजारी, सगळ्यांना आपल्या उत्तम वागणुकीने बांधून ठेवतात. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जो पुरुष अशा मृदुभाषी स्त्रीशी विवाह करतो तो नेहमी आनंदी जीवन जगतो. अशा महिलांना समाजात सन्मान मिळतो. यासोबतच ते आपल्या सासू-सासऱ्यांची प्रतिष्ठाही वाढवतात.

‘या’ राशीच्या मुलांना पाहता क्षणीच त्यांच्या प्रेमात पडतात मुली; लग्न करण्यास असतात उत्सुक

माणसाच्या इच्छा अमर्याद मानल्या जात असल्या तरी सर्व इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत हेही सत्य आहे. म्हणूनच आपण आपल्या वर्तमानात आनंदी राहायला हवे. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा स्त्रिया, ज्यांना परिस्थितीनुसार आपल्या इच्छांना कसे वाकवावे हे माहित असते, त्या सर्वोत्तम पत्नी म्हणून सिद्ध होतात. अशा स्त्रिया आपल्या पती आणि कुटुंबाला चांगले काम करण्याची आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या मर्यादित इच्छांमुळे कुटुंब देखील कधीही आर्थिक संकटात अडकत नाही, ज्याचा फायदा संपूर्ण घराला होतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)