May Horoscope Khappar Yog: ज्योतिषानुसार मे आणि जून महिना खूप हालचालींचा राहणार आहे. हा काळ ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने संवेदनशील असेल. या काळात तयार होणारा विनाशकारी खप्पर योग अनेकांच्या जीवनात चढ-उतार आणू शकतो. विशेषतः ४ राशींनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे, कारण या योगाचा नकारात्मक परिणाम त्यांच्या करिअर, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यावर दिसू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या जीवनात हा अशुभ योग अडचणी निर्माण करू शकतो आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काय उपाय आहेत.

खप्पर योग काय आहे आणि का खास आहे?

ज्योतिष शास्त्रानुसार खप्पर योग तेव्हा तयार होतो जेव्हा मंगळ, शनी, सूर्य आणि राहू सारखे क्रूर ग्रह एका राशीत एकत्र येतात किंवा त्यांचा प्रभाव चारही दिशांनी नकारात्मक स्थिती निर्माण करतो. वर्ष २०२६ मध्ये हा योग १ मे ते २९ जून दरम्यान सक्रिय राहील, त्यामुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम होईल.

या’ ४ राशींनी राहावे सावध

मिथुन राशी: ताण वाढेल आणि अडथळे येतील

तुमच्यासाठी हा काळ मानसिक ताण वाढवणारा ठरू शकतो. एखाद्या गोष्टीबाबत जास्त विचार कराल, त्यामुळे निर्णय घेण्यात अडचण येईल. सुरू असलेल्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि छोट्या समस्या मोठ्या वाटू शकतात. आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्या, कारण चुकीचे निर्णय नुकसान देऊ शकतात.

कन्या राशी: शत्रूंपासून सावध

या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. छोटी समस्या मोठी होऊ शकते. तसेच कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक आयुष्यात लपलेले विरोधक सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे आपले काम आणि योजना विचारपूर्वकच सांगा. मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे.

मकर राशी: करिअर आणि कुटुंबात तणाव

तुमच्यासाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने आव्हानात्मक राहू शकतो. ऑफिसमध्ये वाद किंवा चर्चा होऊ शकते, ज्यामुळे तुमची प्रतिमा प्रभावित होऊ शकते. घरातही मतभेद वाढू शकतात. अशावेळी संयम ठेवणे योग्य राहील.

मीन राशी: निर्णयात गोंधळ आणि खर्च वाढ

तुम्हाला वारंवार तुमच्या निर्णयांवर शंका येऊ शकते आणि चुकीचे निर्णय होण्याची शक्यता वाढेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो आणि भावनिक चढ-उतार राहतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण चुकीचे शब्द नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतात.

हा’ अशुभ योग कसा तयार होतो?

खप्पर योग तयार होण्यामागे अनेक ज्योतिषीय स्थिती कारणीभूत असतात. जेव्हा एका महिन्यात ५ मंगळवार, शनिवार किंवा रविवार येतात किंवा अमावस्येसोबत संक्रांतीचा योग तयार होतो, तेव्हा हा योग प्रभावी ठरतो. १५ जून २०२६ रोजी सोमवती अमावस्या आणि मिथुन संक्रांतीचा योग एकत्र येऊन हा योग अधिक प्रभावी करेल.

या’ काळात काय परिणाम होऊ शकतात?

ज्योतिष शास्त्रात खप्पर योग अशुभ, विस्फोटक आणि संकटकारक योग मानला जातो. याचा अर्थ देश-विदेशात अस्थिरता निर्माण होण्याचे संकेत मानले जातात. या योगामुळे नैसर्गिक आपत्ती, युद्ध, जनहानी, आर्थिक अस्थिरता, अपघात किंवा सामाजिक तणाव वाढू शकतो. तेल आणि गॅसच्या किंमती वाढणे यासारखे परिणामही दिसू शकतात. त्यामुळे हा काळ सावधगिरीने घालवण्याचा सल्ला दिला जातो.

अनिष्ट टाळण्यासाठी सोपे उपाय

जर तुमची राशी या योगाने प्रभावित असेल, तर घाबरू नका. सावधगिरी आणि काही उपायांनी परिणाम कमी करता येतो.

महामृत्युंजय मंत्र जप: दररोज १०८ वेळा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते.
हनुमान पूजन: मंगळवार आणि शनिवार हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण म्हणावा.
मोहरीच्या तेलाचे दान: शनिवारी तेलात चेहरा पाहून दान केल्यास शनि-राहू दोष कमी होतात.
पक्ष्यांना दाणा द्या: सात प्रकारचे धान्य पक्ष्यांना दिल्यास ग्रहांची प्रतिकूलता कमी होते.
शिव पूजा: सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ टाकून पाणी अर्पण करा आणि “ॐ नमः शिवाय” जप करा.

तथापि, कुंडलीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)