हिंदू कॅलेंडरनुसार १६ डिसेंबर पासून खरमास सुरू झाला होता. हिंदू धर्मात खरमासला खूप महत्व आहे. या काळात कोणतेही लग्नासह कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. १६ डिसेंबर पासून सुरू झालेला खरमास १४ जानेवारीला संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार खरमास महिन्यात काही राशींवर याचा परिणाम दिसून येईल. जेव्हा कोणताही ग्रह किंवा नक्षत्रामध्ये बदल होतात त्याचे चांगले वाईट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतात. खरमास संपायला काही दिवस उरले आहेत. या दिवसात काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहेत. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.. मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. मात्र तुम्ही कोणताही निर्णय घेत असाल तर तो काळजीपूर्वक घ्या. या काळात तुम्हाला करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तसंच यावेळी प्रेम प्रकरणात वेळ वाया घालवू नका कारण प्रेमात निराशा मिळू शकते. यासोबतच तुम्हाला यावेळी आर्थिक लाभ होऊ शकतो. तसंच तुम्ही या काळात लांबचा प्रवास देखील करण्याची शक्यता दिसत आहे. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. या काळात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तसंच जुनाट आजार असेल तर त्यापासून सुटका होईल. या काळात तुम्हाला कुटुंबाची चांगली साथ मिळेल तसच कुटुंबात वातावरण चांगले राहील. तसंच कामाच्या ठिकाणी तुमच्या मान- सन्मानात वाढ होईल. या काळात तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. ( हे ही वाचा: १४ दिवसांनी ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? शनिच्या राशीत शुक्र प्रवेश करताच मिळू शकतो प्रचंड पैसा) कर्क राशी कर्क राशीसाठी पुढील सहा दिवस भरभराटीचे असतील. तुम्हाला यावेळी प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता दिसत आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली राहील. तसंच तुमचं वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. यासोबतच शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी यश मिळेल. याकाळात तुमचे आधीपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता दिसत आहे.