Numerology : लग्न हा आयुष्यातील एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण आनंददायी क्षण असतो, जो टिकवण्यासाठी समजदारी, संयम आणि परस्पर समन्वयाची आवश्यकता असते. जिथे अनेक लोक हे नाते पूर्ण समर्पणाने निभावतात, तिथेच काही लोक असेही असतात ज्यांचे नाते गैरसमज, अहंकार, वाद किंवा इतरांच्या प्रभावामुळे तुटते. अनेकदा या परिस्थितींमागे व्यक्तीचा स्वभाव आणि विचार पद्धतीही कारणीभूत असते, ज्याचा संबंध अंकशास्त्राशी (न्यूमरोलॉजी) जोडला जातो.
अंकशास्त्रानुसार, जन्मतिथीवरून मिळणारा मूलांक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, निर्णय घेण्याची क्षमता आणि नात्यांबद्दलचा दृष्टिकोन यावर प्रभाव टाकतो. या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन कसे असेल आणि त्याला वैवाहिक जीवनात किती चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते, हे देखील समजू शकते. आज आपण अशाच एका मूलांकाबद्दल बोलत आहोत, ज्यांच्यासाठी वैवाहिक जीवनआव्हानात्मक मानले जाते, त्यामुळे त्यांच्यासाठी एकापेक्षा जास्त विवाहांचे योग बनू शकतात.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ या तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ असतो. अंकशास्त्रानुसार, या मूलांकाच्या लोकांचे पहिले वैवाहिक नाते अनेकदा स्थिर राहू शकत नाही. मात्र, त्यांच्यासाठी दुसरे किंवा तिसरे लग्न अधिक संतुलित आणि यशस्वी ठरू शकते. असे दिसून आले आहे की, हे लोक आपल्या पहिल्या नात्यात सुरुवातीला पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवतात, परंतु काळ जसा पुढे सरकतो, तशी पती-पत्नीमधील अंतर वाढू लागते. यामुळे नाते कमकुवत होते आणि विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
नात्यात दुरावा येण्याची कारणे
मूलांक ५ चे लोक स्वतंत्र स्वभावाचे असतात आणि त्यांना नवीन गोष्टींचा स्वीकार करण्यात रस असतो. त्यांना एकाच प्रकारच्या दिनचर्येत किंवा वातावरणात जास्त काळ राहणे आवडत नाही. त्यांचे चंचल मन त्यांना सतत बदलांकडे घेऊन जाते, ज्यामुळे कधीकधी त्यांना नात्यात स्थिरता राखणे कठीण जाते. हीच अस्थिरता त्यांच्या वैवाहिक जीवनातही पाहायला मिळू शकते.
लवकर पुढे जाण्याची प्रवृत्ती (मूव्ह ऑन करणे)
या मूलांकाच्या लोकांना नात्यात उत्साह आणि नाविन्याची जास्त गरज असते. जेव्हा नात्यातील नाविन्य कमी होऊ लागते, तेव्हा ते त्यातील रस गमावू लागतात. अशा परिस्थितीत ते नवीन शक्यतांचा शोध घेऊ लागतात. जर त्यांचे नाते तुटले, तर ते जास्त काळ भूतकाळात रमत नाहीत, तर लगेचच पुढे जाऊन नवीन नाते जोडण्यासाठी तयार होतात. अर्थात, मूलांक ५ च्या सर्वच व्यक्तींचे पहिले लग्न अपयशी ठरेल असे नाही. अनेक लोक आपल्या या स्वभावावर मात करून एक यशस्वी वैवाहिक जीवनही जगतात.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
