वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला ऐश्वर्य आणि सुखाचा कारक मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक सुख, वैवाहिक सुख, भोग, कीर्ती इत्यादींची प्राप्ती होते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बुधवार ३१ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रहाणे कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश केला आहे. शुक्राचा संक्रमण कालावधी २३ दिवस आहे. हे संक्रमण काही राशीसाठी समस्या निर्माण करू शकते. जाणून घ्या. वृषभ राशी या काळात तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळू शकतात. परंतु आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा बाळगू नका. या काळात तुमचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे. तुम्ही विद्यार्थी असाल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत असू शकते. ( हे ही वाचा: Planet Transit: ‘या’ राशींसाठी येणारे ४ महिने खूप खास असतील; मिळणार जबरदस्त लाभ) मकर राशी या काळात तुम्हाला आरोग्यासंबंधी समस्या येऊ शकतात. स्वच्छतेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आर्थिक आघाडीवर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात पूर्ण लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मीन राशी या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत खूप चिंतेत असाल. तुम्हाला डोळे, पोट किंवा हार्मोन्सशी संबंधित समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या काळात तुम्ही अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते, विशेषत: विवाहित व्यक्तींनी अतिरिक्त वैवाहिक संबंध टाळणे आवश्यक आहे. या दरम्यान तुम्हाला प्रवासाच्या अनेक संधी मिळतील. तुमचा प्रवास खूप महाग होणार आहे. ( हे ही वाचा: शुक्र २४ सप्टेंबरपर्यंत सूर्य राशीत विराजमान राहील; ‘या’ ३ राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता) मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांना या काळात खूप धावपळ करावी लागेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण संमिश्र परिणाम आणेल. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणाचेही सहकार्य मिळू शकत नाही. तुमची आई तुम्हाला साथ देत असली तरी इतर तुम्हाला मदत करण्यासाठी वेळ देणार नाहीत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाहन जपून चालवा. अनावश्यक खर्च टाळा.