Shukra Gochar 2025: दैत्यांचे गुरू शुक्र एका ठराविक कालवधीनंतर राशीसह नक्षत्र परिवर्तन करतात ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. शुक्र या वेळी मीन राशी आणि उत्तर भाद्रपद नक्षत्रामध्ये विराजमान आहे. पण १६ मे रोजी शुक्र नक्षत्र परिवर्तन करून रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. बुध नक्षत्रामध्ये शुक्र ग्रह आल्याने काही राशींच्या लोकांना लाभ मिळू शकतो. काही राशींना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आज आपण लकी राशींविषयी जाणून घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्रानुसार, दैत्यांचे गुरू शुक्र १६ मे २०२५ रोजी शुक्रवारला दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांनी रेवती नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. या नक्षत्रामध्ये ३१ मे पर्यंत राहीन. त्यानंतर अश्विनी नक्षत्रामध्ये प्रवेश करतील. एकूण २७ नक्षत्रांपैकी शेवटचा नक्षत्र असतो, ज्याचा अर्थ धनवान आणि धनी. या लोकांचा स्वामी बुध आणि राशी मीन असते.
वृषभ राशी (Vrishabha Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे रेवती नक्षत्रामध्ये जाणे लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लाभ भावात शुक्र विराजमान आहे. अशात या राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. दीर्घ काळापासून अडकलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहीन.
कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकणार. तसेच आर्थिक प्रकरणात चांगला लाभ मिळू शकतो. धन ऐश्वर्यात वृद्धी दिसून येईल. दीर्घ काळापासून मेहनत घेत असलेल्या कामात यश मिळू शकते.प्रतिस्पर्धात्मक कामांमध्ये प्रगती दिसून येईल.
कर्क राशी (Kark Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे रेवती नक्षत्रामध्ये जाणे फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. जमीन, घर वाहन संबंधित प्रकरणात अपार यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्य लोकांना या दरम्यान चांगला लाभ मिळू शकतो. या लोकांना ध्येय प्राप्त करण्यात यश मिळू शकते. हे लोक अध्यात्माकडे वळतील. हे लोक धार्मिक यात्रांमध्ये सहभाग घेऊ शकतात. घरी किंवा नातेवाईकांकडे मांगलिक किंवा शुभ कार्यात सहभाग घेऊ शकतात.
मकर राशी (Makar Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे रेवती नक्षत्रामध्ये जाणे अत्यंत लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. अशात हे लोक अनेक कामे करण्यात सक्षम होतील. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. कुटुंबाबरोबर सुरू असलेला वादविवाद आता संपुष्टात येऊ शकतो. या लोकांची बौद्धिक क्षमता वाढेन ज्यामुळे भविष्याशी संबंधित मोठे निर्णय हे लोक घेऊ शकतील. या लोकांना व्यवसाय क्षेत्रात लाभ मिळू शकतो. या लोकांच्या आयुष्यात आनंद आनंद दिसून येईल. नात्यामध्ये सुख शांती दिसेल. तसेच या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)