Suryadev Enemy Zodic Signs: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. परंतु राशीचक्रातील १२ राशींपैकी काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर सूर्याची शुभ दृष्टी फारशी पडत नाही. या राशींना सूर्यादेवाच्या शत्रू राशी म्हणून ओळखले जाते. ज्यामुळे या राशींना समाजात पद-प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
‘या’ आहेत सूर्यदेवाच्या शत्रू राशी
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि सूर्य यांच्यात वैर आहे. जेव्हा या राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव पडतो, तेव्हा व्यक्तीच्या सुखसोयी आणि ऐश्वर्य कमी होऊ लागते. घरातील वातावरण तणावपूर्ण असू शकते आणि तुमच्या आईची प्रकृती चिंतेचा विषय असू शकते. याशिवाय, कामातील अनपेक्षित व्यत्यय आणि मालमत्ता किंवा गाडी संबंधीचे वाद तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात.
तूळ (Tula Rashi)
ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीतील सूर्य ‘नीच’ (म्हणजेच सर्वात कमजोर) मानला जातो. या परिस्थितीत, सूर्यदेव या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास डगमगवू शकतो. अशी व्यक्ती योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आपले प्रस्थापित सामाजिक स्थान गमावण्याची भीती ही एक सततची चिंता असते. याशिवाय, वडिलांशी असलेले मतभेद किंवा त्यांचे सततच्या आरोग्य समस्याही उद्भवू शकतात.
मकर (Makar Rashi)
मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनि हा सूर्याचा पुत्र असला तरी, ज्योतिषशास्त्रानुसार ते दोघे कट्टर शत्रू मानले जातात. ज्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या करिअरवर थेट परिणाम होतो, ज्यामुळे त्यांना यश मिळवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागतो. तुम्ही कितीही मेहनत केली तरी, त्याचे श्रेय अनेकदा दुसराच घेतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांसोबतचे संबंध बिघडू शकतात. हाडांच्या किंवा डोळ्यांशी संबंधित समस्यांमुळे तुमच्या आरोग्यालाही त्रास होऊ शकतो.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ ही शनिदेवाची राशी देखील आहे , त्यामुळे येथेही सूर्यदेवाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात नकारात्मक राहतो. सूर्याच्या प्रभावामुळे, कुंभ राशीच्या लोकांना अनेकदा एकटेपणा आणि समाजापासून तुटल्यासारखे वाटते. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल, तर फसवणूक होण्याची शक्यता असते. अहंकारामुळे पती-पत्नीमधील संघर्ष वाढू शकतो. शिवाय, अचानक आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
