महाराष्ट्र राज्यात सुमारे १५० गावांमध्ये चांगल्या प्रकारे जलसंधारणाचे काम झाले आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची हे गाव त्यापैकी एक. मुख्य म्हणजे जलसंधारणाचे काम झाल्यामुळे जे अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे, ते सर्व गावकऱ्यांनी वाटून घेण्याची प्रथा येथे रूढ झाली आहे.