भरधाव कंटेनर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. औरंगाबाद नाशिक रस्त्यावर माळीवाडा जवळ ही घटना घडली. या भीषण अपघातात गाडीचा पुढील भाग चकनाचूर झाला होता. अपघातानंतर कंटेनरचा चालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्यातील एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तर दुसऱ्याचे नाव पराग रामचंद्र कुलकर्णी वय 32वर्ष(रा.तारांगण,कासलीवाल, पाडेगाव) असे आहे. या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, पराग हा मूळचा नाशिक येथील रहिवासी होता. नोकरी निमित्त तो मागील काही वर्षांपासून शहराजवळील तारांगण सोसायटीत राहत होता. तो बजाज कंपनीत कामाला होता. पराग मित्रासोबत कामानिमित्त (एम एच 23 ए डी1654) या कार मधून बाहेरगावी गेला होता. काम आटोपल्यावर माघारी परतात असताना काळाने घाला घातला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनला पाचारण करीत कंटेनर खालील कार बाहेर काढत दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारर घाटी रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी तपासून दोघानाही मृत घोषित केले. अपघातानंतर कंटेनर चा चालक पसार झाला आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.