औरंगाबादमध्ये नैराश्यातून जवानाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दैवत साळुंके असे जवानाचे नाव आहे. ते मूळचे साताऱ्याचे रहिवासी असून मागील तीन वर्षांपासून औरंगाबादमध्ये कार्यरत आहे.

३२ वर्षीय दैवत साळुंके छावनी परिसरातील दारूगोळा तयार करणाऱ्या १६९ युनिटमध्ये कार्यरत होते. मागील दोन दिवसांपासून दैवत नैरश्यात होते. यातूनच औरंगाबाद-नगर रोडवरील पुलावरून उडी घेऊन त्यांनी जिवनयात्रा संपवली. आत्महत्यावेळी दैवत यांच्या अंगावर लष्कराचा गणवेश तसाच होता.

मूळचे सातऱ्याचे असलेले दैवत गेल्या तीन वर्षांपासून पत्नी आणि मुलासोबत छावनीमध्ये लष्कराच्या कॉर्टरमध्ये राहत होते. दैवत यांच्या आत्महत्यामागील कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.