औरंगाबादमध्ये टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू  लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात करोनाबाधितांची संख्या ९४ ने वाढली. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या दोन हजार ५२४ एवढी झाली आहे. आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद शहरातील मदनी चौकातील ६५ वर्षांचा पुरुष, फाजलपुरा भागातील ५२ वर्षांचा व्यक्ती तर मिलकॉनर्र भागातील तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे. त्यातील एका रुग्णास पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता. दरम्यान घाटी रुग्णालयातील मृत रुग्णसंख्या आता १०१ वर गेली आहे.