भरधाव कारने रिक्षाला दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद-जालना मार्गावर हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मृत चौघेही रिक्षातून प्रवास करत होते. यातील एका जखमीवर औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहे.

औरंगाबाद जालना रोडवर आणखी एक भीषण अपघात झाला. बुधवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जालना येथून निघालेला रिक्षा औरंगाबादच्या दिशेने जात होता. शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंप समोरून जात असताना त्याच वेळी विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारी कारदुभाजकावरून येऊन रिक्षावर वेगाने धडकली. या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशी जागीच ठार झाले. तर यात एक जण जखमी झाला. ही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जखमीवर सध्या घाटीत उपचार सुरू आहे.