वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावरील व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांनी शेतकऱ्याकडे चक्क एक लाख २५ हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीनंतर तहसीलदारांना लाच घेताना अटक केली. याप्रकरणी तहसीलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंगापूरचे (जि. औरंगाबाद) तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे व महसूल सहायक अशोक बाबूराव मरकड यांनी आपेगाव येथील तक्रारदाराकडे १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तहसीलदार शिंगटे यांनी तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीमधील सातबाऱ्यावरील कूळ कायद्याप्रमाणे असलेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी ही लाच मागितली होती.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tahsildar caught taking bribe from farmer in aurangabad bmh
First published on: 10-04-2021 at 15:08 IST