औरंगाबादमधील पतंजलीचे विक्रेते आणि व्यापाऱ्याच्या घरात चोरांनी डल्ला मारत लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. सोनं, चांदी आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.

सुराणा नगर येथे राहणारे घनश्याम राठी यांच्या घराचे कुलुप तोडून १० तोळे सोनं, ११ किलो चांदी आणि ३९हजार रुपयाची रोख रक्कम असा एकूण ७ लाख १८ हजारांचा ऐवज चोरांनी लंपास केला. मनोज आणि घनश्याम दोघे भाऊ शेजारी राहतात. मात्र, भाचीचे लग्न असल्यामुळे सर्व कुटुंबिय सोलापूरला लग्नाला गेले होते. संधीचा फायदा घेत चोरांनी घरावर डल्ला मारला. यामध्ये सात लाखांपेक्षा आधिकचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शामसुंदर वसुरकर करत आहेत.