औरंगाबाद शहरातील बेगमपुरा भागात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आदिल चाऊस (वय २२) असं या तरुणाचं नाव आहे. आदिल इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे आई- वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शनिवारी पहाटे चार वाजता घरी आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर ते काही वेळासाठी नातेवाईकांकडे गेले. सकाळी सातच्या सुमारास ते पुन्हा घरी आले. पुन्हा दरवाजा ठोठावूनही घरातून कोणीही प्रतिसाद दिली नाही. अखेर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना मुलाने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.