औरंगाबाद : रस्त्यात उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीवर टेम्पो धडकून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू, तर १४ जण जखमी झाले. सर्व मृतक सिल्लोडजवळील मंगरूळ गावचे रहिवासी असून त्यात दोन सख्खे भाऊ व सख्ख्या जावांचा समावेश आहे. हे सर्वजण कन्नड तालुक्यातील घाटनांद्रा येथून एका लग्नाहून येत असताना शहरापासून ५ किमी अंतरावरील मोढा फाटय़ाजवळ बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला.

अशोक संपत खेळवणे (५२), लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (४५), संजय संपत खेळवणे (४२), रंजनाबाई संजय खेळवणे (४०), जिजाबाई गणपत खेळवणे (६०), संगीता रतन खेळवणे (३५), अशी मृतांची नावे आहेत. कासाबाई भास्कर खेळवणे (४०), सार्थक आजीनाथ खेळवणे (८), आजीनाथ शेषराव खेळवणे (४४), गणेश सुखदेव बोरडे (१९), आकाश रमेश बोरडे (१८), हृषीकेश गोिवदराव आरके (२०), संतोष गणपत खेळवणे (३०), धुळाबाई नारायण बोरडे (५०), दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे (४५), ओमकार रतन खेळवणे (१६), सुभाष राजेश खेळवणे (४६), सुलोचना आत्माराम खेळवणे (५५), सुरेश विठ्ठल खेळवणे (५० सर्व रा.मंगरूळ) तर कलाबाई बाबू म्हस्के (४०, रा.अनवी, ता.सिल्लोड) अशी जखमींची नावे आहे. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, तर काही जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात तर काहींना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.  जखमींपैकी काहींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यात उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या  ट्रॅक्टरवर पिकअप  (एम २०-२९८१ ) आदळून मोठा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की पीकअप वाहनाचे दोन तुकडे होऊन वाहनाचे काही भाग इतरत्र विखरून पडले.

घटनेची माहिती मिळताच महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्याचबरोबर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह मंगरूळ येथे पाठविण्यात आल़े