औरंगाबाद– कन्नड तालुक्यातील आडगाव जेहूर परिसरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर सायंकाळी खारी नदीला आलेल्या पुरात बैलगाडीमधील आठ जण वाहून गेले. यातील पाच जण बचावले. तर एक महिला व दोन मुलींचा मृत्यू झाला.

साक्षी अनिल सोनवणे (वय १६), पूजा दिनकर सोनवणे (१२)  मीनाबाई दिनकर बहीरव (५० सर्व रा आडगाव) यांच्यापैकी दोन जणींचे मृतदेह नागरिकांना झाडांला लटकलेले आढळून आले असून एक जणीचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता. दोन्ही मृतदेह नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेत ज्योती वाल्मिक सोनवणे (३५), समीक्षा अनिल सोनवणे (१४), उषा दिनकर सोनवणे (३०), पूजा विकास बहिरव, विकास दिलीप बहिरव हे बचावले. मृत व वाहून गेलेल्यांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर आले. बैलगाडीतील आठ जण वाहून गेल्याची वार्ता पंचक्रोशित वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते.

navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
Yavatmal, Bodies Found, Two Missing Brothers, small pond, Under the railway bridge, Arni Road bypass,
बेपत्ता भावंडांचे मृतदेह डोहात आढळले
palghar police arrested suspected killer in woman murder case
अनाकलनीय हत्येचा पालघर पोलिसांकडून उलगडा; लोणावळा येथे फिरायला नेतो सांगून मोखाडा येथे केली होती हत्या