चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसे कार्यकर्तांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. त्यानुसार आज राज ठाकरे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, याप्रकरणी आता न्यायालयाने त्यांचाविरोधातील अटक वॉरंट रद्द केला असून त्यांना ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस असं काही करतील असं वाटत नाही, ते बदला…”, तैलचित्राच्या निमंत्रणावरून संजय राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, “महाराष्ट्रात…”

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता

यांसदर्भात बोलताना राज ठाकरेंचे वकील म्हणाले, ”वैद्यकीय कारणांमुळेच राज ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाही, हे आम्ही आज न्यायायलापुढे मांडले. न्यालयाने हे मान्य केलं असून अटक त्यांच्याविरोधातील वॉरंट रद्द केला आहे. तसेच याप्रकरणी २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.”

हेही वाचा – परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचानं केलं राज ठाकरेंचं स्वागत; ५० फूट फुलांच्या हाराची जोरदार चर्चा!

नेमकं काय आहे प्रकरण?

२००८ साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला होता.