औरंगाबाद : औरंगजेब कबर हवीच कशाला, असा सवाल करत मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पुढील पाच दिवस कबरीवर कोणासही जाता येणार नाही, असा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी बजावला आहे. खुलताबाद येथील कबरीवर एमआयएमचे नेते नतमस्तक झाल्यानंतर घडामोडींना वेग आला होता. ही कबर औरंगाबाद जिल्ह्यात हवीच कशाला, असा सवाल पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता, असे सांगत आता मनसेने या वादात उडी घेतल्यानंतर पुढील पाच दिवस कबरीवर कोणालाही जाता येणार नसल्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

औरंगाबाद येथील कबरीच्या वादाविषयी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले, ‘ही कबर येथेच हवीच कशाला, असा प्रश्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विचारला होता. आता पुन्हा तोच प्रश्न मनसेकडून विचारला गेला. खरे या कबरीकडे कोणी फिरकतच नाही. मुस्लीम लोकही कोणी जात नाही. नाहक चर्चा करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. 

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

 खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर खोदल्याची अफवा पसरविण्यात आल्याने पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. हा विशेष बंदोबस्त नाही, पण काळजी घेतली जात असल्याचे पोलीस निरीक्षक हातमोडे यांनी सांगितले.