औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेने शहरातील विविध प्रश्नांकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली, तसेच प्रकल्पांचे लोकार्पण केले. मुंबईप्रमाणेच औरंगाबादमध्ये दुमजली बसेस खरेदी करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील खाम नदीच्या पुनर्जीवनाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. राज्यात ५१ टक्के नागरीकरण झालेले आहे. ४३ स्मार्ट शहरे आहेत. पायाभूत सुविधांचा विकास करताना जैवविविधता आणि पर्यावरणही जपावे लागेल, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी पुनर्जीवनाचे औरंगाबाद महापालिकेने केलेले काम राज्यातील इतर शहरांनाही मार्गदर्शक ठरू शकते, असे सांगितले. महापालिकेच्या करावर नागरिकांची सुविधा व्हावी यासाठी जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह विविध ८० प्रकारच्या सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करून देता येतात का, याचाही अभ्यास केला जात आहे. हे काम लवकरच मार्गी लावू, असे ते म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election of aurangabad municipal corporation shiv sena city aurangabad aaditya thackeray mission akp
First published on: 28-01-2022 at 00:05 IST