एका कंपनी कामगाराने स्वतः विष प्राशन करून पोटच्या दोन जुळ्यांनाही विष पाजल्याची घटना जालना येथे घडली. त्या तिघांनाही उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले असता संबंधित व्यक्तीचा शनिवारी (दि.28) मृत्यू झाला. भागवत पंजाजी काळे (३४) असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भक्ती आणि वेद अशी उपचार सुरू असलेल्या जुळ्यांची नावे आहेत. या मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – औरंगाबाद शिक्षकमधील भाजपची मरगळ दूर

pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

हेही वाचा – औरंगाबाद : खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप

भागवत काळे हे शहरातील एका कंपनीत काम करतात. सध्या ते जालना येथे वास्तव्याला आहे. शनिवारी सकाळी फिरायला जातो, असे सांगून घरातून निघाले. मात्र नंतर ते दोन्ही मुलांना घेऊन अंबड रस्त्यावर आले आणि तिथे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, भागवत काळे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.