औरंगाबाद : औरंगाबादच्या आरोग्य क्षेत्रात ४० वर्षांपासून अत्यंत सचोटीने काम करणारे डॉक्टर अशी ओळख असणारे डॉ. रघुनाथ भास्कर भागवत यांचे  सोमवारी पहाटे निधन झाले. मृत्युसमयी ते ९२ वर्षांचे होते. १९५८ ते १९८४ या कालावधीपर्यंत वैद्यकीय महाविद्यांलयामध्ये प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्राचे विभागप्रमुख म्हणून काम करणाऱ्या डॉ. रघुनाथ यांनी मराठवाडय़ात अनेक डॉक्टर घडविले. सामाजिक विषयांवर तसेच राजकीय भाष्य करताना स्पष्ट भूमिका घेणारे डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. औरंगाबाद येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांचे ते वडील होत.   मध्यप्रदेशातील इंदोर येथे २० ऑगस्ट १९३० साली जन्मलेल्या आर. बी. भागवत हे औरंगाबाद शहरातील सार्वजिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत. अनेकदा ते सायकलवर अशा कार्यक्रमांना येत. १९६१ साली ते पुण्याहून औरंगाबाद येथे आले.

वैद्यकीय महाविद्यालयात काम करताना त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणाचे आदर्श आजही सांगितले जातात. त्यांनी बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे येथील ससून रुग्णालयात तसेच औरंगाबाद नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातही प्राध्यापक म्हणून नोकरी केली. १९९० पासून औरंगाबाद येथील कमल नयन बजाज रुग्णालयात त्यांनी विश्वस्त म्हणूनही काम केले. शालेय व महाविद्यालयीन काळात ते विविध परीक्षांमध्ये तर अव्वल होतेच याशिवाय कुस्तीमध्येही ते अव्वल होते.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
Rat tail in student food akola
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा
girl committed suicide Pavnur
वर्धा : परीक्षेत नापास होण्याची भीती, शेतकरी कन्येने उचलले टोकाचे पाऊल…

१९८०- ८१ साली त्यांना शैक्षणिक व सामाजिक कामातील उल्लेखनीय कामांबद्दल शिक्षक पुरस्कारही मिळाला होता. मराठवाडय़ातील वैद्यकीय शिक्षणासह अनेक बदलाचे ते साक्षीदार होते. योग्य निदान करण्याविषयी त्यांची ख्याती होती. वैद्यकीय व्यावसाय करणारा डॉक्टर या ओळखीपेक्षाही वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक अशी त्यांची ओळख अनेकांच्या मनात होती. साहित्य, संगीत अशा कलाप्रांतातील संवेदनशील माणसांची मैत्री करणारे डॉ. भागवत यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील स्थित्यंतरांचे तपशील माहीत असणारा तज्ज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.