औरंगाबाद: दुचाकीवरून दोन बहिणींसह कंपनीत  निघालेल्या भावाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी वाळूंज औद्योगिक क्षेत्रातील एनआरबी चौकाजवळ घडली. अनिता कचरू लोखंडे (२२), दीपक कचरू लोखंडे (२०) व निकिता उर्फ राणी कचरू लोखंडे (१८ सर्व रा. आसाराम बापू नगर, रांजणगाव), अशी अपघातात ठार झालेल्या भावंडांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, रांजणगाव येथील दीपक लोखंडे हा गुरुवारी सकाळी त्याची बहीण अनिता व निकिता या दोघींना दुचाकी (एमएच २१ एएम ६९९५) वरून वाळूंज एमआयडीसीतील रेणुका ऑटो कंपनीत सोडण्यासाठी निघाला होता. एनआरबी चौकाजवळील कार्तिकी हॉटेल समोर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच ०४ एफ जे -५२८८) दुचाकीला धडक दिली. यामध्ये  दुचाकीवरील तिघांचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रांजणगाव ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून तिघांनाही घाटी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूंज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
old lady dies with 5-year-old grandson in tanker accident
टँकर अपघातात ५ वर्षीय नातवासह आजीचा मृत्यू
vasai worker death, vasai labor death marathi news
वसई: बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, एक जण जखमी
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?