ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारत सतत प्रगती करत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच आपल्या देशाने जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी करताना भारताने जपानला मागे टाकले आहे. या यादीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर, तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने केलेल्या या कामगिरीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. PTI च्या माहितीनुसार, “भारत पुढील पाच वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट बनेल”, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.

भारतातील ऑटोमोबाईल उद्योग आणि जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनण्याच्या संधीबाबत बोलताना त्यांनी आकडेवारींची माहिती दिली. ते म्हणाले, “सध्या देशातील ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार हा ७.५ लाख कोटी रुपये इतका आहे. या क्षेत्रामुळे आतापर्यंत तब्बल ४.५ कोटी रोजगार निर्माण झाले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना सर्वात जास्त Goods and Services Tax (GST) देत आहेत.”

us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
Tanush Kotian made his IPL 2024 debut
PBKS vs RR : राजस्थानसाठी IPL पदार्पण करणारा कोण आहे तनुष कोटियन? ज्याने १०व्या क्रमांकावर झळकावलंय शतक
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक

भविष्यात आपला देश सर्वात मोठे ऑटोमोबाईल मार्केट बनू शकतो असा आत्मविश्वास असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “२०२८ पर्यंत देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राचा आकार हा तब्बल १५ लाख कोटी रुपये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे आपण येत्या पाच वर्षांमध्ये ऑटो क्षेत्रामध्ये पहिल्या स्थानावर असू असा मला विश्वास आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगतीमुळे आपला देश महासत्ता बनेल. ऑटो उद्योग भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्ठा बनण्यास मदत करेल.”

Honda Cars India च्या विक्रीदरात तब्बल ४३ टक्क्यांनी घट; मे २०२३ मध्ये झाली फक्त ४,६६० युनिट्सची विक्री, पाहा आकडेवारी

तसेच नितीन गडकरी यांनी पेट्रोल, डिझेल अशा इंधनाच्या ऐवजी पर्यावरण पूरक इंधनांच्या पर्यायांचा वापर करण्यावर भर द्यायला हवे असेही सांगितले. सध्या आपला देश हा जीवाश्म इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. “भारत दरवर्षी सुमारे १६ लाख कोटी रुपये किंमत असलेले जीवाश्म इंधन (पेट्रोल, डिझेल) यांची आयात करतो. Green hydrogen आणि ammonia या पर्यायांचा वापर भविष्यात मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. भारताला इंधनाची, ऊर्जेची निर्यात करणारा देश बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहेठ” असे विधान नितीन गडकरींनी केले.