सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न जुमानता, अस्मितेच्या नावाने राजकारण करण्याची पंजाब सरकारची सध्याची कृती ही गंभीर आहे. कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्या सरकारवर आहे, त्या पंजाबच्या प्रकाशसिंग बादल सरकारनेच अधिकृतपणे कायदेभंगाचा पण केला असून ही परिस्थिती आपला अराजकाकडे सुरू असलेला प्रवास अधोरेखित करते.
या मुद्दय़ावर रोखठोकपणे भाष्य करणाऱ्या ‘बेदिलीचे बादल’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
* indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.