फार काही अतिवाईट नसणे अशी जर चांगुलपणाची व्याख्या करावयाची झाल्यास अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या सलग चौथ्या अर्थसंकल्पाचे वर्णन बरा असेच करावे लागेल. हा अर्थसंकल्प सादर करून काही तरी केल्यासारखे दाखवणारे हे सरकार कार्यक्षम वाटू शकते. पण, त्यामुळे सध्याचे वास्तव मात्र बदलत नाही. अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्याचे विश्लेषण ‘आम्हां मेंढरांस ठावे’  या अग्रलेखात करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

महत्त्वाकांक्षी काही तरी करण्यापेक्षा ते केल्यासारखे दाखवणे ही या सरकारची कार्यशैली राहिलेली आहे. या आधीचे मनमोहन सिंग सरकार काहीच करत नसल्याने केल्यासारखे दाखवणारे हे सरकार कार्यक्षम वाटू शकते. परंतु त्यामुळे केवळ प्रतिमा संवर्धन होते. असा स्पष्ट उल्लेख या अग्रलेखात करण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने अर्थतज्ज्ञ अजित रानडे आणि डॉ. रूपा रेगे-नित्सुरे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहीताना उपयोग होणार आहे.

विद्यार्थ्यांना पुढच्या गुरूवापर्यंत आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरूवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भिड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.