मित्रहो,
सरकारच्या ऊर्जानिर्मितीच्या धोरणांत मूलभूत गफलत असून केंद्र सरकारने वेळेत कोळसा ऑर्डर न केल्याने देशावर वीजटंचाईचे संकट येत आहे, संपूर्ण देश अंधारात बुडणार आहे” अशा आशयाचे मेसेज देशद्रोही आणि धर्मद्रोही लोकांकडून पसरविले जात आहेत. तुम्ही खरे देशप्रेमी असाल तर शेतकऱ्यांचे आंदोलन आणि लखीमपूरच्या घटनेकडे आपण जसे दुर्लक्ष केले तसेच दुर्लक्ष वीजटंचाईच्या मुद्यावरही कराल आणि हिंदुस्तानची बदनामी करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कटाला बळी पडणार नाही अशी मला आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं पाहता, अंधार हा नैसर्गिक असून, दिवे लावून कृत्रिम प्रकाश निर्माण करणे हे निसर्गधर्माच्या विरुद्ध आहे. आपल्या ऋषीमुनींनी म्हटलेलंच आहे की, अंधाराच्या शून्यात ईश्वर आपल्या सर्वात जवळ असतो. ज्याप्रमाणे प्रकाशाशिवाय आस्थेची कल्पना केली जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे अंधाराशिवाय विश्वाची कल्पना अशक्य आहे. आज आपण अंधाराकडे पाठ करून मोठी किंमत मोजत आहोत. आपले डोळे दिवसभर स्क्रीनवर लागून असतात. रात्री विजेचा प्रकाश आपल्या झोपेत अडथळा आणतो. अंधारापासून वाचण्याऐवजी आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. तो आपल्या कित्येक अडचणींवर इलाज करू शकतो कारण अंध:कारात दैवी रहस्य लपले आहे. आपण इतके सुदैवी की, अंधाराचं महत्व जाणणारे सरकार आज आपल्याला लाभले आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog coal crisis is central government plan to show importance of darkness satirical by sabi perera scsg
First published on: 13-10-2021 at 14:05 IST