हिंदू पौराणिक कथा आपल्या अद्भुतरम्य, चमत्कार, प्रेम, भक्ती अशा विविध छटांनी समृद्ध आहेत. या कथा पंक्तीतील एक कथा म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाची आणि त्याच्या दोन पत्नींची त्या म्हणजे रिद्धी आणि सिद्धी यांची. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धी आणि सकारात्मकता ही गणेशाची खास वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात गणेशाच्याच आगमनाने होते. गणरायांच्या उपासनेने भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात. गणरायांचे “वाहन” उंदीर” आहे. तर गणरायाला गोड पदार्थ प्रिय असतात. मोदक तर गणरायांच्या सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. परंतु केवळ गणेशच नाही तर गणेशाची रिद्धी आणि सिद्धीसह असणारी उपस्थतीती अधिक लाभदायक मानली जाते. म्हणूनच येणाऱ्या गणेश चतुर्दशीच्या निमित्ताने गणरायाची प्रेमकथा जाणून घेणे नक्कीच रंजक ठरणारे आहे.

आपले लाडके गणपती बाप्पा हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे धाकटे चिरंजीव. गजानन हे शिव आणि पार्वती या दोघांचेही लाडके. गणरायांचा विवाह हा रिद्धी आणि सिद्धी या दोन बहिणींशी झाला होता. त्यांच्या विवाहाची कथा रंजक असली तरी या कथेतून नैतिकता आणि मूल्ये शिकायला मिळते. गणरायांच्या विवाहाची कथा केवळ रोमँटिक प्रेम कथा नसून आपल्याला नातेसंबंधातील बांधिलकी, चिकाटी आणि समर्पणाचे महत्त्व शिकवते.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…

आणखी वाचा : पांडव-कौरव नाही तर ‘हे’ होते महाभारताच्या युद्धाला कारणीभूत?

देवी पार्वती आणि भगवान शिव यांना वाटणारी आपल्या मुलांच्या विवाहाची काळजी

हिंदू देवता परिवारातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय कुटुंब म्हणजे भगवान शिवशंकराचे. माता पार्वती, कार्तिक स्वामी आणि गजानन असे हे कुटुंब. प्रत्येक आई वडिलांप्रमाणे एकदा शिव आणि पार्वती आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चर्चा करत होते. अचानक, देवी पार्वतीने गजानन आणि कार्तिकेय यांच्या विवाहाबद्दल चिंता व्यक्त केली. माता पार्वतीच्या विचारांशी सहमत झालेले शिव शंकर आधी विवाह कोणाचा करावयाचा या विचारात मग्न झाले. आधी लग्न कोणाचे या विषयावर तोडगा काढण्यासाठी शिव आणि माता पार्वतीने आपल्या दोन्ही मुलांना बोलावणे धाडले. माता-पित्याच्या एका हाकेवर कार्तिक स्वामी आणि गजानन प्रकट झाले. माता पित्याने आपल्या चिंतेचा विषय त्यांना सांगितला. आणि आधी लग्न कोणाचे करायचे यावर मार्गही सांगितला. माता पित्याने सांगितलेल्या मार्गानुसार दोन्ही मुलांना विश्वाची प्रदक्षिणा पूर्ण करावयाची होती. जो आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचे लग्न आधी होईल.

गणपतीने हुशारीने स्पर्धा जिंकली!

अटी व शर्ती जाणून घेतल्यावर कार्तिकेय आणि गणेश उत्तेजित झाले. कार्तिकेय त्याच्या वाहनावर म्हणजेच मोरावर स्वार होऊन विश्वाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यास गेलाही. परंतु गजानन मात्र जागचा हलला नाही, त्याला माहित होते, आपल्या इटुकल्या उंदरावर बसून प्रदक्षिणा पूर्ण करणे शक्य नाही. म्हणून त्याने ही स्पर्धा युक्तीने जिंकायचे ठरविले. तो भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या समोर उभा राहिला आणि त्यांच्याभोवती प्रदक्षिणा मारू लागला. हे पाहून भगवान शिव आणि देवी पार्वती दोघेही आश्चर्यचकित झाले! गणपतीने त्यांच्या भोवती ७ प्रदक्षिणा घातल्या आणि “नमस्कार” करत त्यांच्यासमोर उभा राहिला. शिव आणि पार्वती यांच्या संगमानेच विश्वच बनते, हे रहस्य गणरायास ठावूक होते. त्याने शिव-पार्वतीलाच प्रदक्षिणा घालून स्पर्धा जिंकली.

भगवान शिव आणि देवी पार्वतीने प्रथम भगवान गणेशाच्या लग्नाची योजना केली

स्पर्धा जिंकण्याच्या त्याच्या तंत्रामागील सुज्ञ कारण जाणून घेतल्यावर भगवान शिव आणि देवी पार्वतीने गणरायाचा विजय झाल्याचे घोषित करत, गजाननाचा विजय झाल्याचे घोषित केले. देवी पार्वतीने प्रत्येकाला तिचा मुलगा, भगवान गणेशासाठी एक अतिशय सुंदर आणि बुद्धिमान जोडीदार शोधण्याची आज्ञा दिली. लवकरच, एका राजाच्या वाड्यातून गणपतीसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. देवी पार्वती विवाहाच्या प्रस्तावाने प्रभावित झाली आणि खूप आनंदी झाली. आणि तिने तो लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. रिद्धी आणि सिद्धी या सर्वात सुंदर आणि ज्ञानी राजकन्या होत्या. गणपतीलाही त्या दोघी आवडल्या.

लग्नाची जोरदार तयारी झाली. भगवान शिव आणि देवी पार्वतीने भगवान गणेशाच्या लग्नाचे ठिकाण म्हणून एक मोठा महाल तयार करण्यासाठी विश्वकर्मा यांना सांगितले. लग्न भव्य होते! भगवान गणेशाच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या या भव्य आणि महान विवाहासाठी प्रत्येक देव, दानव, ऋषी इत्यादींना आमंत्रित केले होते. आणि मोठ्या थाटामाटात गणेशाचा विवाह पार पडला. गणेशाच्या विवाहानंतर रिद्धी-सिद्धी याना दोन पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांची नावे शुभ आणि लाभ अशी अनुक्रमे ठेवण्यात आली.

आणखी वाचा : विदर्भ कन्या रुक्मिणीचे हरण कृष्णाने का केले?

गणरायाच्या प्रेमकथेचा समारोप

भगवान गणेश आणि रिद्धी-सिद्धी यांची प्रेमकथा ही भक्ती, वचनबद्धता आणि शाश्वत प्रेमाची सुंदर कथा आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, रिद्धी आणि सिद्धी या अनुक्रमे समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीच्या देवी आहेत आणि त्यांनी त्यांच्या अतूट भक्ती आणि निष्ठेने भगवान गणेशाचे हृदय जिंकले असे म्हटले जाते.
हा दैवी प्रणय आपल्याला आपल्या नातेसंबंधातील चिकाटी, विश्वास आणि समर्पणाचे महत्त्व तसेच कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेमाची शक्ती शिकवतो. ही एक कालातीत कथा आहे जी जगभरातील लोकांना प्रेरणा देते, खऱ्या प्रेमाच्या सौंदर्याची आणि आश्चर्याची आठवण करून देते. भगवान गणेश आणि रिद्धी-सिद्धी यांच्या प्रेमकहाणीमध्ये केवळ प्रेम आणि विवाहाचा समावेश नव्हता. पण, एक महान उद्देश आणि दैवी शक्ती देखील होती.

Story img Loader