-मराठी माणसाच्या हितासाठी कुणाचेही पाय चाटायला तयार असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. मी लाचार झालो म्हणून नव्हे तर केवळ मराठी माणसाचे हित डोळ्यासमोर ठेऊन मी युतीचा हात पुढे केल्याचे राज ठाकरे यांनी दादरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये म्हटले. मराज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना राज ठाकरेंच्या मनसेला मात्र गळती लागली आहे. नाशिकसह मुंबई, ठाण्यात मनसेमधून आऊटगोईंग जोरात आहे. त्यामुळे मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच मुंबईत शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटल्यावर मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला. मात्र मनसेने पुढे केलेला युतीचा हात शिवसेनेने झिडकारुन लावला.