मुंबई:गतवर्षी राज्याचा विकास दर ९.१ टक्के असताना चालू आर्थिक वर्षांत (२०२२-२३) हा दर ६.८ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या विकासात महत्त्वाचे स्थान असलेल्या कृषी आणि सेवा या दोन क्षेत्रांमध्ये घसरण अपेक्षित धरण्यात आली आहे. दरडोई उत्पन्नातही महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर गेला आहे. उद्योगनिर्मिती आणि बांधकाम क्षेत्रातील वाढ दिलासादायक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात सादर केला. करोनाकाळातून बाहेर पडत राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचा दिलासा राज्यकर्ते तसेच सरकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असला तरी प्रत्यक्ष आकडेवारी काहीशी चिंताजनक मानावी लागेल. चांगला पाऊस होऊनही कृषी क्षेत्राचा विकास दर घटणार आहे. अवकाळी पावसासह नैसर्गिक आपत्तीचा या क्षेत्राला फटका बसला आहे. सेवा क्षेत्रात राज्याची घोडदौड आतापर्यंत चांगली होत होती. कृषी आणि सेवा क्षेत्रातील पिछेहाटीचा राज्याच्या विकास दरावर परिणाम झालेला दिसतो.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two point three percent decline in growth rate mumbai amy
First published on: 09-03-2023 at 04:14 IST