मुंबईः भारताला हळद उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविता येईल आणि २०३० पर्यंत हळद निर्यात १०० कोटी डॉलरचे उद्दिष्ट साध्य करेल, असा अंदाज आयसीआरआयईआर-ॲम्वे इंडियाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने व्यक्त केला. मात्र हळद उत्पादन स्थिर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकारकडून समर्पक हस्तक्षेपाची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा >>> रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग

Most indebted farmers Punjab, Maharashtra
महाराष्ट्र नव्हे पंजाबात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दावा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Information about impact of union budget 2025 on agriculture in marathi
विश्लेषण : कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?
China obstacle to becoming the world manufacturing hub
जगाचे उत्पादन केंद्र बनण्यात चीनचा अडसर
Environmental clearance from the state itself revised notification issued by the central government Mumbai news
राज्यातूनच पर्यावरणविषयक परवानगी, केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी; गृहप्रकल्पांना दिलासा
Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
Health Minister Prakash Abitkar announces separate health policy for the Maharashtra state
राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी

तेलंगणाच्या निजामाबादमध्ये राष्ट्रीय हळद मंडळाच्या उद्घाटनानंतर प्रसिद्ध झालेल्या या अहवालात जागतिक हळद उत्पादक आणि निर्यातदार म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी आवश्यक धोरणांचा आराखडा मांडण्यात आला आहे, असे आयसीआरआयईआरचे संचालक दीपक मिश्रा यांनी बुधवारी अहवालाचे अनावरणप्रसंगी सांगितले. राष्ट्रीय मंडळाच्या स्थापनेने गुणवत्ता मानके, उत्पादकांचा शोध आणि उत्पादन प्रमाणन, तसेच निर्यातयोग्य चाचणी प्रक्रिया सुलभ बनेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?

भारतात हळदीच्या ३० पेक्षा जास्त जाती असून, अधिक भौगोलिक संकेत (जीआय) मानांकित उत्पादनांना वाव आहे. चालू हंगामात देशभरात २,९७,४६० हेक्टर क्षेत्रफळावर हळदीची लागवड केली गेली असून, १०.४१ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. अहवालाने असेही नमूद केले आहे की, अनेकांगी आरोग्यदायी फायदे असलेल्या उच्च-कर्क्युमिन हळदीच्या जागतिक मागणीच्या केवळ १० टक्के पुरवठा करण्यास भारतीय उत्पादक सक्षम आहेत.

Story img Loader