वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सप्टेंबरअखेरपर्यंत विद्यमान आर्थिक वर्षात सायबर फसवणुकीमुळे भारतीयांचे ११,३३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर’ने बुधवारी दिली.

Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
Enforcement Directorate ED files Enforcement Case Information Report ECIR in Torres scam case Mumbai print news
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
Mumbai targeted by cyber thugs after gang war terrorist attacks print exp
गँगवॉर, दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई सायबरठगांचे टार्गेट… गतवर्षी १२०० कोटींची सायबर फसवणूक! केवळ १० टक्के रिकव्हरी! 
Fraud of Rs 36 lakhs due to money rain complaint against two fraudsters in Mhaswad
पैशांच्या पावसापोटी ३६ लाखांची फसवणूक, म्हसवडमध्ये दोन भोंदूबाबांविरुद्ध तक्रार

सर्वाधिक नुकसान भांडवली बाजाराशी संबंधित फसवणुकीमुळे झाले असून त्यासंबंधी २,२८,०९४ तक्रारी आल्या असून, एकूण नुकसान ४,६३६ कोटी रुपयांचे आहे. फसवणूक झालेल्या कित्येक व्यक्तींनी यासंबंधाने तक्रारींची नोंददेखील न केल्याने नुकसानीचे प्रमाण यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, डिजिटल अटकेच्या फसवणुकीच्या ६३,४८१ तक्रारींचा समावेश असून, त्या माध्यमातून १,१६१ कोटी रुपये लुबाडले गेले आहेत. ‘सिटिझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम’च्या (सीएफसीएफ आरएमएस) आकडेवारीनुसार, एकट्या २०२४ मध्ये सायबर फसवणुकीच्या जवळपास सुमारे १२ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, यापैकी ४५ टक्के प्रकरणे कंबोडिया, म्यानमार आणि लाओस या देशांतून उद्भवली आहेत. २०२१ मध्ये स्थापना झाल्यापासून ‘सीएफसीएफ आरएमएस’ने ३० लाखांहून अधिक तक्रारी नोंदवल्या आहेत, ज्यात एकंदर नुकसान २७,९१४ कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे. २०२३ मध्ये सायबर गुन्ह्यांशी संबंधित ११ लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या, तर २०२२ आणि २०२१ मध्ये तक्रारींचे प्रमाण अनुक्रमे ५.१४ लाख आणि १.३५ लाख असे होते.

हेही वाचा >>>‘स्पेक्ट्रम’ लिलावांसाठी बँक हमीची अट शिथिल

डिजिटल अटकेबाबत पंतप्रधान मोदींचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मन की बात या त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून, ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यांविरुद्ध सावधिगिरीचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कोणतीही सरकारी संस्था गुन्ह्यासंबंधित अशा प्रकारे तपासासाठी फोनच्या माध्यमातून व्यक्तीशी संपर्क साधत नाही. कायद्याअंतर्गत ‘डिजिटल अरेस्ट’ यांसारख्या शिक्षेची कोणतीही व्यवस्था नाही.

Story img Loader