वसई : महागाईची चढती भाजणी, भांडवली बाजारातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा अभ्यास करून दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बदलत्या काळानुसार गुंतवणुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. महागाई आणि गुंतवणुकीची सांगड घालणारे वित्तव्यवस्थापन आवश्यक असून गुंतवणुकीचे पुनरावलोकन करताना आपण केलेली किंवा करत असलेली गुंतवणूक काळानुरूप आहे का? त्याचा आढावा घेऊन त्यानुसार गुंतवणुकीत बदल केले आहेत का हे पडताळून बघणे आवश्यक आहे, असा कानमंत्र ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ सत्रात बुधवारी देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी, दुपारी या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकदार जागराचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत हा कार्यक्रम विरार पालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडला. या वेळी वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे उपस्थित होते. महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये असणाऱ्या कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनी आपल्याला मिळत असलेल्या पैशातून जमेल तितकी गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे असे मार्गदर्शन बगाडे यांनी केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment advice for vvmc employees in loksatta arthsalla event zws
First published on: 02-12-2022 at 02:32 IST