मुंबई : रिझर्व्ह बँकेने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा १.६६ लाख रुपयांवरून २ लाख रुपये केली आहे. शेतीसंबंधित वाढते खर्च आणि एकंदर महागाईचा वाढता पारा लक्षात घेऊन, शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला. यामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्धता वाढणार आहे.

हेही वाचा >>> परदेशी चलनांतील ठेवींवरील व्याजदर मर्यादेत वाढ; ढासळत्या रुपयाला सावरण्यासाठी पाऊल

Borgaonkarwadi parking lot, Kalyan,
सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज

आघाडीच्या बँकांना तारणमुक्त कर्जाच्या योजनेसंबंधित सूचना लवकरच देण्यात येईल, असे मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते. वर्ष २०१९ मध्ये तारण मुक्त कृषी कर्जाची मर्यादा मध्यवर्ती बँकेने १ लाख रुपयांवरून १.६ लाख रुपयांपर्यंत वाढवली होती. केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाने, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आर्थिक संकट लक्षात घेता ३ लाख रुपयांपर्यतच्या पीक कर्जासाठी प्रक्रिया, दस्तऐवज, तपासणी आणि खातेवही शुल्क आणि इतर सर्व सेवा शुल्क देखील माफ केले आहे.

Story img Loader